राज्यमंत्री म्हणून केलेले कार्य
संकल्प विकासाचा अविरत जनसेवेचा
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा कृषी, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, सामाजिक न्याय, मराठी भाषा, वक्फ आदी खात्यांचा राज्यमंत्री या नात्याने राज्यभरातील जनतेसाठी हितकारक निर्णयांसाठी नियोजन व अंमलबजावणी.
- अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या माध्यमातून राज्यभरात गरजू कुटुंबांपर्यंत धान्याचा पुरवठा.
- कोरोना संक्रमण काळात देखील राज्यव्यापी दौरे काढून धान्यपुरवठा अबाधित राखण्यासाठी मोहीम.
- स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्यांची दखल घेत त्याची तातडीने सोडवणूक.
- राज्यव्यापी दौरे करून गोरगरीब लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक आणि विविध कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेत सक्रिय मोहीम राबवली.
- सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन व भविष्यात पूर परिस्थिती टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर अहवाल बनवून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द
- महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना पूरग्रस्तांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्यासाठी कृती आराखडा (Action Plan) राबविण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमांची अंमलबजावणी
- शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रात ‘कृषी संजीवनी’ मोहीम राबविली. कृषी राज्यमंत्री या नात्याने राज्यभर विविध आघाड्यांवर या मोहिमेचे नेतृत्व केले.
- सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, युवक, महिला आदींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या
- कृषी राज्यमंत्री या नात्याने कोरोना काळात शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे, कीटकनाशके पुरविणे, शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करणे, लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेत पोहोचवणे, अतिवृष्टी व पुरामुळे शेती नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी, विविध कृषी विकास योजनांचा लाभ मिळवून देणे, शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अशा कितीतरी आघाड्यांवर महत्त्वाची भूमिका बजावली.
- केंद्रातील भाजप सरकारने एकतर्फी लादलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात जनजागृती करून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला.
- कृषी राज्यमंत्री या नात्याने शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय दिला. कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून कृषी संशोधनाला चालना दिली.
- अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री या नात्याने विविध जनकल्याणकारी योजना राबविल्या. गोरगरीब व निराधार लोकांना अल्प दरात भोजन देणारी ‘शिवभोजन थाळी’ ही महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्रभर सुरू केली. कोरोनासारख्या संकटकाळात या योजनेने गोरगरिबांना मोठा आधार दिला. एक कोटीहून अधिक मोफत व सवलतीच्या दरात जेवणाची थाळी पुरविण्याचे उद्दिष्ट महाविकास आघाडी सरकारने पूर्ण केले. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्याच्या कॉंग्रेस पक्षाच्या संस्कृतीचा पाईक होण्याचा प्रयत्न या खात्याच्या माध्यमातून केला.
