भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून केलेले कार्य
संकल्प विकासाचा, अविरत जनसेवेचा
भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना अतिवृष्टी, महापूर, कोरोना महामारी आदी नैसर्गिक संकटाच्या काळात लोकांना तातडीने मदत करून आवश्यक उपाययोजना केल्या. जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. जिल्ह्याच्या विकासाला गती दिली.
- कोरोना महामारीच्या काळात संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत सातत्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
- कोरोनाग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार व अन्य सुविधा मिळाव्या म्हणून स्वत: पुढाकार घेतला.
- भंडारा जिल्ह्यात प्रत्यक्ष दौरे करून कोव्हिड सेंटर, कोरोनाग्रस्त रुग्ण विलगीकरण कक्ष आणि सुविधांची पाहणी केली. समस्यांची सोडवणूक करून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात सक्रिय सहभाग घेतला.
- डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यामार्फत तयार करण्यात आलेल्या सॅनिटायझरचे भंडारा जिल्ह्यात वाटप केले.
- भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असताना तातडीने पूरस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या. पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून पुराची झळ बसलेल्या लोकांना सर्व प्रकारची मदत केली. पुनर्वसन कार्यात सक्रिय सहभाग घेतला.
- पुरापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. पूर स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनासोबत बैठका घेऊन योग्य त्या सूचना केल्या. पूर नियंत्रण आराखड्याचे नियोजन केले.
- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव या गावाने सार्वजनिक शौचालय बांधकाम स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष मा. नाना पटोले यांच्या समवेत कन्हाळगाव येथे भेट दिली. तेथील लोकांचा सत्कार करून अभिनंदन केले.
- ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भंडारा जिल्हा कॉंग्रेस सेवादलाच्या वतीने लाखनी येथे आयोजित केलेल्या तिरंगा पदयात्रेत सहभाग नोंदवला.
- भंडारा शासकीय रुग्णालयात दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नवजात बालकांच्या कुटुंबीयांची तातडीने भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच शासकीय रुग्णालयाला भेट देऊन तातडीच्या उपाययोजना केल्या.
