भारत जोडो यात्रेतील सहभाग
संकल्प विकासाचा, अविरत जनसेवेचा
सर्वधर्मसमभाव व समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी सदैव काम करण्याची कॉंग्रेस पक्षाची विचारधारा जोपासत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. काँग्रेसचे नेते आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांनी भारताचे संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन सन २०२२ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो यात्रा’ काढली होती. या ऐतिहासिक यात्रेत अग्रेसर राहून खा. राहुलजी गांधी व इतर ज्येष्ठ कॉँग्रेस नेत्यांसोबत पायी चालत सहभागी झालो. हा एक अविस्मरणीय अनुभव होता.
- विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशात सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाहीमुळे लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. जातीय व धार्मिक सलोखा बिघडल्याने वातावरण दूषित झाले आहे. लोकांच्या मनातील भीती, द्वेषभावना दूर करून देशात न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, सामाजिक व राष्ट्रीय ऐक्य पुनर्स्थापित करण्यासाठी तसेच महागाई, बेरोजगारीसारख्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. या यात्रेच्या महाराष्ट्रातील टप्प्याचे नियोजन करण्यात अग्रेसर राहिलो व मोठ्या उत्साहात नेटके नियोजन केले.
- भारत जोडो’ यात्रेबाबत सांगली जिल्ह्यात व्यक्तिगत पातळीवर एलईडी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती केली. या यात्रेत पलूस-कडेगाव मतदारसंघासह सांगली जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांना सहभागी करून घेत ‘नफरत छोड़ो, भारत जोड़ो’ हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात रुजवला.
- ‘भारत जोडो’ यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सोलापूर जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर व तुळजापूर येथे आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
- कॉँग्रेसचा कृतिशील कार्यकर्ता म्हणून ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होऊन प्रेम, सदभावना व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आणि कॉँग्रेस पक्षाचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. संपूर्ण देशाला एकसंध राहण्याचा संदेश ‘भारत जोडो’ यात्रेने दिला, युवकांना नवी दिशा व प्रेरणा दिली.
- आदरणीय राहुलजी गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरात भूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने हाती घेतलेल्या ‘हात से हात जोडो’ अभियानात सहभाग घेतला. या अभियानाच्या निमित्ताने आयोजित विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.
